🌹🌹🌹🌹🌹🔥🌹🌹🌹🌹🌹
*माणसाला अध्यात्मिक दृष्ट्या प्रौढ बनवण्याचे कार्य नामस्मरण करते. दैनंदिन जीवन हीच त्याची साधना होते. तिच्यामधून भगवंताच्या कर्तेपणाची भावना उगम पावते. मग सद्गुरुंच्या कृपाप्रसादाने ती उत्कर्षबिंदू गाठते. अशा रीतीने अखंड नामस्मरणाला भगवंताच्या कर्तेपणाची जोड मिळाली म्हणजे शरणागत भाव उत्पन्न होतो. शरणागतीने नामधारकाचा प्रपंच भगवंताची लीलाभूमी बनून जातो. आहे त्या अवस्थेमध्यें आपलें समाधान टिकत नाही, आणि पाहिजे ते मिळालें तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. समाधान ही भगवंताची खरी देणगी आहे. आणि ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचें नाम.*
🌹🌹🌹🌹🌹🔥🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"