Tuesday, December 3, 2019

Finding master

It is reported: one of the Sufis, Junaid, came to an old fakir, and he asked him, "I have heard that you know. Show me the path."
The old man said, "You have heard that I know. You don't know. Look at me and feel."
The man said, "I cannot feel anything. Just do one thing: show me the path where I can find my Master."
So the old man said, "You go first to Mecca. Have the pilgrimage and search such and such a man. He will be sitting under a tree. His eyes will be such: they will be throwing light, and you will feel a certain perfume like musk around him. Go and seek."
And Junaid traveled and traveled for twenty years. Wherever he heard a Master is, he will go. But neither the tree was there, nor the perfume, the musk, nor those eyes the old man has described. The personality was not there. And he had a ready-made formula, so he will judge immediately," This is not my Master," and he will move ahead.
After twenty years he reached under a tree. The Master was there. The musk was floating in the air, just like a haze around the man. The eyes were fiery, a red light was falling. This is the man He fell into his feet and said, "Master, I have been searching for you for twenty years."
The Master said, "I am also waiting for you twenty years. Look again." He looked. THIS WAS THE SAME MAN TWENTY YEARS BEFORE WHO HAS SHOWN HIM THE WAY TO FIND THE MASTER. Junaid started weeping.
He said, "What? You played a joke upon me? Twenty years wasted Why couldn't you say that you are my Master?"
The old man said, "That would not have helped; that was of not much use – because unless you have eyes to see... These twenty years helped you to see me; I am the same man. But twenty
years before you had told me that "I don't feel anything." I am the same, but now you have become capable to feel. You have changed. These twenty years rubbed you hard. All the dust has fallen; your mind is clear. This fragrance of musk was there that time also, but you were not capable to smelling it. Your nose was closed; your eyes were not functioning; your heart was not really beating. So, contact was not possible."
You don't know nobody can say where the trust will happen. I don't say trust the Master, I simply say find a person where trust happens – that person is your Master. And you cannot do anything about it. You will have to wander. The thing is certain to happen, but the seeking is necessary because seeking prepares you. Not that the seeking leads you to the Master, seeking prepares you so that you can see. He may be just near you.
You can go anywhere. Then space doesn't make any difference. You remain in contact. Not only space, but time also doesn't make any difference. A Master may be dead, you remain in contact. He may have dropped his physical body, you remain in contact. If a trust happens, then time and space both are transcended.
Trust is the miracle. You can be in closeness with Mohammed or Jesus or Buddha right now if trust is there. But it is difficult! It is difficult because you don't know how. You cannot trust a living person, how can you trust a dead. If trust happens, then you are close to Buddha right now. And for persons who have faith, Buddha is alive. No Master ever dies for those who can trust. He goes on helping; he is always there. But for you, even Buddha is there physically, standing behind you or in front of you, just sitting by your side, you are not close to him. There may be vast space between you. Love, trust, faith, they destroy space, time, both.

कर्म सिद्धांत

कर्म सिद्धांत
मला काही मेसेजस  आले कि आमचे नातेवाई बरेच आजारी असून सध्या बेडरिडन झाले आहेत. सगळ्या गोष्टी बिछान्यावरती कराव्या लागतात. तर त्यांची लवकर सुटका कधी होईल याबाबतीत काही तरी सांगा.जोतिष शाश्त्रात एक अलिखित नियम आहे तो म्हणजे कोणाचाही मृत्यू सांगू नये त्याप्रमाणे मी या गोष्टीला स्पष्ट पणे नकार दिला.

प्रत्येक जीवात्मा जन्माला येताना ठराविक श्वास घेऊनच जन्माला येत असतो.ते श्वास संपले कि लगेचच सध्याचा देह त्याग करून निघून जात असतो. पूर्वीच्याकाळी ऋषी मुनी श्वसनावरती नियंत्रण ठेवून आपले आयुष्य वाढवू शकत होते. आपण जे ध्यान करतो तेव्हा सुद्धा नकळतपणे आपले श्वसन नियंत्रण होत असते. म्हणजे जेव्हा आपण प्राणायाम वगैरे क्रिया करीत असतो तेव्हा नकळतपणे श्वसन नियंत्रण होऊन काही काळ श्वास बंद झाल्याने आपण आपले आयुष्य काही सेकंद ,मिनिटे,तास,दिवस ,आठवडे ,महिने किंवा वर्ष या क्रमाने वाढवत असतो.

आपले  नातेवाईक ,परिचित ,मित्र यांचे  अचानक झालेले मृत्यू आपल्याला चटका लावून जातात तर काही जण वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळून असतात. नकळतपणे आपण सुद्धा त्यांची यातून सुटका झाली तर बरे असा विचार करत असतो. हि वेळ त्या व्यक्तीचे आणि त्याचबरोबर इतर व्यक्तींचे सुद्धा भोग असतात. ती व्यक्ती आणि त्यांची सेवा करणाऱ्या व्यक्ती यांचे एक कार्मिक कनेक्शन असते. ते आधीच्या जन्माचे कर्म या जन्मी त्या विशिष्ट वेळी फळाला आलेले असते. त्या व्यक्तीची जमेल तेवढी सेवा करून या कर्म बंधनातून आपली सुटका करून घेणेच योग्य असते.

एकेकाळी कर्तबगार असणाऱ्या व्यक्ती अंथरुणाला खिळून असतात आणि त्यांचे नातेवाईक त्यांची यातून कधी सुटका होईल या विचारात असतात. इथे एक मेख अशी सुद्धा आहे अशा व्यक्ती पुर्वाश्रमी कर्तबगार जरी असल्या तरी नकळतपणे त्यांची आपल्या कर्तव्यात चूक झालेली असते. किंवा आपले कर्तव्य बजावण्यात कमी पडलेले असतात. मग ती आई वडिलांची सेवा असेल किंवा बायको मुले ,बहीण ,भाऊ यांच्या प्रति अपेक्षित कर्तव्य यापैकी काहीही असू शकते. मग ह्याची शिक्षा नकळतपणे अशी भोगावी लागते. या जन्मात किंवा मग पुढच्या जन्मात. कोणत्याना कोणत्या स्वरूपात.

लग्न करून मुलेबाळे झाल्यावरती संसार सुखाचा त्याग करून दूर कुठेतरी साधना करायला जाण्याची इच्छा असणाऱ्या लोकांनी याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकवेळ तुम्ही परमार्थ केला नाहीतरी चालेल पण प्रपंच सोडून जाऊन आपले कर्तव्य न बजावणाऱ्या लोकांची पारमार्थिक उन्नती हि कालांतराने थांबते.  (अर्थात याला काही अपवाद असू शकतात पण अशा व्यक्ती पुन्हा जन्म घेऊन त्याचे परिमार्जन करून आपले हे कार्मिक कनेक्शन शून्य करून टाकतात.) त्यामुळे सर्वसंग परित्याग करणाऱ्या लोकांनी हि बाजू सुद्धा लक्षात घ्या.

त्याचप्रमाणे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती,दुर्धर आजार झालेल्या व्यक्ती यांची अशी झालेली अवस्था याचा पूर्वजन्मांशी संबंध असू शकतो. गतजन्मात तुम्ही ज्या जीवाला कळत नकळत त्रास दिलेला असेल तर त्या जीवाचे शिव्या शाप कोणत्या ना कोणत्या जन्मात भोगावे लागतातच. आपल्याला सध्या होणार त्रास हा का होत आहे हे साधनेची विशिष्ट पातळी गाठलेली अध्यात्मिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती सांगू शकते.

या सर्व गोष्टीत सद्गुरू/नवनाथ हस्तक्षेप करू शकतात .आपली फळाला आलेली कोणती कर्मे या जन्मात भोगू शकतो आणि कोणती नाही तसेच त्याची तीव्रता किती असावी हे मॅनिप्युलेशन करण्याचे काम सद्गुरू करू शकतात. लक्षात घ्या हि सुद्धा साधी गोष्ट नाही यात बऱ्याच गोष्टींचा विचार व्हावा लागतो. म्हणूनच नेहेमी म्हणायचं " सद्गुरू/नवनाथ शरण आलोय ;सांभाळून घ्या ".

काही व्यक्तींचे आपल्याशी उत्तम जमते आणि काही व्यक्तींशी अजिबात जमत नाही याचे पण कुठेतरी आधीच्या जन्माचे कार्मिक कनेक्शन जोडलेले असते. अशा वेळी आपण त्या व्यक्तीला आधीच्या जन्मात काहींना काहीतरी त्रास दिलेला असतो त्या त्रासाचा हिशेब चुकवण्याचे  काम ती व्यक्ती या जन्मी तुम्हाला त्रास देऊन पूर्ण करीत असते. अशावेळी त्या व्यक्तीची माफी मागणारी प्रार्थना करून आपण आपली या कार्मिक कनेक्शन मधून सुटका करून घ्यावी. म्हणजेच कर्म बंधनातून मुक्त होऊन जावे.

एक लक्षात घ्या आपल्याला ज्या व्यक्ती भेटत असतात किंवा संपर्कात येत असतात त्यांचा आपल्या पूर्व जन्माशी कधीना कधी संबंध आलेला असतो आणि एक कार्मिक कनेक्शन निर्माण झालेले असते. म्हणजे आपल्याला जे लोक भेटत असतात ते केवळ कोणत्याना कोणत्या स्वरूपाचा हिशेब चुकता करण्यासाठी मग तो चांगला असेल किंवा वाईट असेल. हे कर्म बंधन समजून घेणे आवश्यक आहे.

आपले आई वडील,भाऊ बहीण, बायको नवरा ,मुले यांच्याशी जो संबंध येत असतो त्याचा संबंध हा पूर्वजन्मांशी असतो. यातील प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला हिशेब चुकवायचा असतो मग तो चांगल्या किंवा वाईट कर्मांचा सुद्धा असू शकतो.

त्यामुळे आत्ताचा जो जन्म मिळाला आहे तो या सर्वांचे हिशेब चुकवण्यासाठी मिळाला आहे तो चुकवण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न करा आणि कर्म बंधनातून मुक्त व्हा.

Sunday, December 1, 2019

अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच उपासना.

२ डिसेंबर
अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच उपासना.
देवाच्या आड काय येत असते ? आपल्याला देवाची प्राप्ति होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो. आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो, हे थोडा विचार केला असता समजुन येईल. ज्याला आपले म्हणायला पाहिजे होते त्याला आपले न म्हणता, आपण दुसर्‍या कोणाला तरी आपले म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ, या सर्वांना आपले म्हणत असतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात. परंतु देवाला जर आपले म्हटले, तर तो सदासर्वकाळ आपलाच असतो, आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो. तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहीत आहे ना ? आपले भ्रतार आपले रक्षण करतील असे तिला वाटत होते. परंतु त्या कोणाकडून काही होणे शक्य नाही असे तिला दिसले, तेव्हा तिने अनन्यतेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हांच कृष्ण तिच्याकरिता धावून आले. म्हणजे काय, की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसतात. आपण परमात्म्याला आपले म्हणावे, 'मी त्याचा आहे' अशी सदासर्वकाळ आठवण ठेवावी, आणि जे जे घडत असते ते ते सर्व त्याच्या इच्छेने होत असते ही भावना ठेवावी. अशी भावना होण्याकरिता आपण त्याची उपासना करायला पाहिजे. उपासना करणे म्हणजे तरी काय ? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत, असे वाटणे. असे वाटण्याकरिता त्याच्या नामस्मरणात राहणे जरूर आहे.आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदासर्वकाळ आपल्या जवळ राहतो. तुम्ही कोणाचे नाव घेतले म्हणजे त्याची मूर्ति जशी तुमच्या ध्यानात येते, त्याप्रमाणे देवाचे नाव घेतले म्हणजे तो तुमच्याजवळ असतो. देव कसा आहे हे विचारले तर कसे सांगता येईल ? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी सांगितले आहे. नाम हे त्याचे रूप, म्हणून नामस्मरण केले म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणे भागच पडते. हे नामस्मरण कसे करावे ? समर्थांनी सांगितले आहे की, 'काहीच न करूनि प्राणी ॥ रामनाम जपे वाणी । तेणे संतुष्ट चक्रपाणी . भक्तालागी सांभाळी ॥' आपण नाम घेताना काहीच करीत नाही का ? आपण त्या वेळी संसाराची काळजी करीत असतोच ना ? म्हणजेच त्या वेळी आपण मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो ! मीपणारहित जो नामस्मरण करील त्यालाच देव सांभाळित असतो; आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम चालवीत असतो.

३३७. आपण कोणाचे तरी होऊन राहावे.; गुरूचे तरी किंवा देवाचे तरी.